Tanaji Sawant | मोदींना पुन्हा पंतप्रधान पदी निवडून आणण्यासाठी अर्चना पाटलांना भरघोस मत द्या
Tanaji Sawant | देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्या पासून देशाच्या विकासाला गती प्राप्त झाली आहे. गेल्या दहा वर्षात मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या, याचा फायदा देशातील करोडो लोकांना झाला आहे. त्यामुळे लोकांमध्ये मोदीजींबद्दल प्रेम, आदर आणि विश्वास आहे. हा विश्वास कायम ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा “अबकी बार ४०० पार” हा नारा यशस्वी करण्यासाठी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी विराजमान करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे असे आवाहन धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी यावेळी उपस्थित शिवसैनिकांना केले.
विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान पदी निवडून देण्यासाठी या लोकसभा निवडणुकीत धाराशिव लोकसभा मतदारसंघ उमेदवार अर्चना पाटील यांना भरघोस मतांनी निवडून देण्याकरिता धाराशिव जिल्हा शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा संवाद मेळाव्याचे आयोजन आज भैरवनाथ शुगर वर्क्स संचलित तेरणा सहकारी साखर कारखाना, ढोकी येथे करण्यात आले होते.
या लोकसभा निवडणुकीत ४०० पेक्षा जास्त जागा NDA च्या निवडून येतीलच परंतु त्यात धाराशिव जिल्ह्याचा खासदार हा वैश्विक नेते मोदीजींच्या विचाराचा असला पाहिजे. त्याकरिता धाराशिव महायुतीचे उमेदवार अर्चनाताई पाटील यांना विजयी करण्यासाठी आम्ही सर्व धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिक सज्ज असल्याची ग्वाही धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी निमित्ताने दिली.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
Pune Loksabha | मोहोळ प्रचंड मताने निवडून येतील, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
Amol Kolhe | केंद्रातील सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेष, अमोल कोल्हेंचा सूतोवाच