देशात आणि राज्यात सध्या शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडवणारे सरकार अस्तित्वात- जयंत पाटील

मुंबई- देशात आणि राज्यात सध्या शेतकरी विरोधी सरकार अस्तित्वात आहे. दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्याचप्रमाणे राज्यात देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दुर्लक्ष केले जात आहे. आपण सर्व शेतकऱ्यांची मुलं आहोत सध्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे प्रश्नन न सोडवणारे सरकार अस्तित्वात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच सरकार पुन्हा आणण्याकरिता शरद पवार साहेब यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिल्यानंतरच शेतकऱ्यांच्या समस्या सोडणार आणि न्याय देणारं सरकार येईल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज आम आदमी पार्टीच्या शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बिपिन चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आज प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेश केला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हेमंत टकले, सरचिटणीस रवींद्र पवार, प्रदेश युवक अध्यक्ष महबूब शेख, संदीप बेडसे, मिलिंद आव्हाड राजू राजापूरकर यांची उपस्थिती होती.

जयंत पाटील पुढे म्हणाले की शेतकरी विरोधी सरकारला त्यांची जागा दाखवण्याकरिता शेतकऱ्यांच्या संघटनेची ताकद एकत्रित आली पाहिजे त्यानंतर शेतकरी विरोधी सरकारला आपण धक्का लावू शकतो. तसेच शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार आणता येणार आहे. महाराष्ट्रातील शेतकरी गेल्या वर्षभरात अनेक नैसर्गिक आपत्तीला शेतकऱ्यांनी तोंड दिले आहे. सरकारने घोषणा करायची मात्र मदत करायची नाही असे धोरण सरकारचे आहे. विलंबनाने करण्यात आलेल्या मदतीला काही अर्थ राहत नाही.

पाटील म्हणाले की आजही महाराष्ट्रातील काही भागात पाऊस आहे तर काही भागात दुष्काळाची परिस्थिती आहे. शेतकऱ्यांवर पुन्हा पेरणीचे संकट देखील आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून शेतकऱ्यांना कुठलीही मदत देण्यात येत नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. एकेकाळी महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे आत्महत्या होत असताना शरद पवार साहेब केंद्रीय कृषी मंत्री असताना पंतप्रधान यांना यवतमाळ मध्ये घेऊन आले होते. यावेळी त्या शेतकऱ्यांना 6 हजार कोटी रुपयांचे केंद्राकडून पॅकेज मंजूर करून देण्याचे काम पवार साहेबांनी केले होते. शेतकऱ्यांचे समस्या सोडवण्यासाठी शरद पवार साहेबांनी शेतकऱ्यांकरिता विविध योजना आत्महत्याग्रस्त भागात राबवल्या होत्या असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे

देशात सध्या काय चाललं आहे सर्वांनाच माहित आहे शेतकरी आंदोलन करत आहे मात्र सरकार दुर्लक्ष करत आहे. मणिपूर मधील घटने वर चर्चा करण्यात यावी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर बोलावे याकरता विरोधकांकडून मागणी करणाऱ्या खासदारांना निलंबित करण्याचे काम करण्यात येत आहे. सध्या देशातील जनता अस्वस्थ आहे. शेतकरी अस्वस्थ आहे. देशातील महिला सुरक्षित नाही देशातील सुरक्षा आपल्या मदतीला येणार का? अशी शंका सामान्य जनतेच्या मनात आहे. अशा विचित्र परिस्थितीत भारतातील जनतेची मानसिकता जात आहे. या मानसिकतेतून देशाला बाहेर काढण्यासाठी अधिक ताकतीने शरद पवार साहेब यांच्या मागे उभ राहिल पाहिजे असे देखील जयंत पाटील यांनी यावेळी म्हटले आहे.

शेतकऱ्यांचा विकास व्हावा याकरिता आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे शेतकऱ्यांचा विकास हा केवळ जाणता राजा तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वातच शेतकऱ्यांचा विकास होऊ शकतो. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या हिताचे काम करण्याची क्षमता केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असून ते शरद पवार साहेबच करू शकतात त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार साहेब आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर विश्वासू पक्ष प्रवेश करत आहे असे बिपिन चंद्रकांत पाटील यांनी पक्षप्रवेशादरम्यान म्हटले आहे.