चोरांना कधी आशीर्वाद मिळत नाही; आदित्य ठाकरेंनी शिवसेनेला मारला टोमणा

मुंबई: रविवारपासुन मुंबईत सहा जिल्हात भाजपा- शिवसेनेची आशीर्वाद यात्रा (Ashirwad Yatra) सुरू झाली असून यामुळे ठाकरे गट चांगलाच अस्वस्थ झाला असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. वरळी मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी वरळीतील अनेक मंडळांना भेटी दिल्या. तसंच घरोघरी जाऊन त्यांनी लोकांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यांनी आशीर्वाद यात्रा तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेनेच्या नेत्यांवर टीका केली.

मी आज वरळीत आलो आहे. भेटीगाठी घेत आहे. लोकांचा पाठिंबा मिळत आहे, असं आदित्य म्हणाले. विरोधकांच्या आशिर्वाद यात्रेवर जास्त काही बोलणार नाही. एवढंच सांगतो की लोकांच्या मनात चीड आहे. त्यामुळे चोरांना कधी आशीर्वाद मिळत नाही. शेवटी चोर चोर असतात आणि गद्दार गद्दार असतात, असं आदित्य ठाकरे म्हणालेत.