… अन्यथा भाजपा युवा मोर्चा राज्यभर औरंगझेब धार्जिण्या आव्हाड यांचे पुतळे जाळून निषेध आंदोलन करणार 

मुंबई – “अफजल खान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत, शाहिस्तेखान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत ना! तुम्ही मुघलांचा इतिहास काढल्यावर कसं चालेल”, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी यापूर्वी औरंगजेब हा क्रूर नव्हता, असे विधान केले होते. त्यानंतर, आता पुन्हा एकदा अफजल खान आहेत, म्हणून शिवाजी महाराज आहेत, असे म्हटल्याने वाद निर्माण झाला आहे.

दरम्यान, आता भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस विक्रांत पाटील (Vikrant Patil) यांनी आव्हाडांवर टीका केली आहे. ते म्हणाले,  छत्रपती शिवाजी महाराज उभ्या महाराष्ट्राची अस्मिता आहेत आणि जितेंद्र आव्हाड सारखी औरंगझेब आणि शायीस्तेखानाची पिलावळ जर महाराजांचा असा अपमान करणार असेल तर भाजपा हे मुळीच खपवून घेणार नाही.जितेंद्र आव्हाड हे जाणीवपूर्वक वारंवार ठरवून करीत आहेत हे महाराष्ट्राला कळून चुकले आहे आणि आता ते शिव प्रेमींच्या भावनांचा अंत पाहत आहेत.

जितेंद्र आव्हाड यांनी या विषयात त्वरित माफी मागावी अन्यथा युवा मोर्चा राज्यभर औरंगझेब धार्जिण्या आव्हाड यांचे पुतळे जाळून निषेध आंदोलन करेल; आणि आव्हाडांनी जर अशी नालायकपणाची वक्तव्य त्वरित थांबवली नाहीत तर औरंगझेबाच्या या पिलावळीला भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्रात फिरू देणार नाही.असं पाटील यांनी म्हटले आहे.