जनकल्याणाच्या योजना : ‘अशाप्रकारे’ विवाह करणाऱ्या जोडप्यांना मिळतेय २० हजार रुपये अनुदान 

कन्यादान योजना

योजनेच्या अटी
◆वधू व वर हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत.
◆नवदांपत्यांसाठी वधू/वर यापैकी दोन्ही किंवा एकजण हे अनुसूचित जाती (नवबौद्ध), विमुक्त जाती, भटक्या जमाती(धनगर व वंजारीसह), विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासप्रवर्गातील असावेत.
◆वराचे २१ व वधूचे वय १८ वर्षापेक्षा कमी असू नये.
◆वधू व वर यांच्या प्रथम विवाहासाठीच हे अनुदान अनुज्ञेय असेल. परंतू विधवा महिलेस दुसऱ्या लग्नाकरितादेखील अनुज्ञेय राहील.
◆बालविवाह प्रतिबंध कायदा व हुंडा प्रतिबंध कायद्यांतर्गत असलेल्या कोणत्याही कलमाचा भंग
या दांपत्य/कुटुंब यांच्याकडून झालेला नसावा.
◆जातीचे प्रमाणपत्र सक्षम प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेले असावे.
◆स्वयंसेवी संस्था/ यंत्रणा नोंदणीकृत असावी.
◆सामुहिक विवाह सोहळ्यासाठी किमान १० दांपत्ये (२० वर व २० वधू) असणे आवश्यक राहील.
◆सेवाभावी संस्था/यंत्रणा सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या मागासवर्गीय जोडप्याची माहिती व संबंधितांची छायाचित्रे विहित नमन्यातील अर्ज इ. कागदपत्रे विवाह संपन्न होणाच्या किमान १५ दिवस अगोदर विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी आताचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे सादर करतील.

योजनेअंतर्गत लाभ
●कन्यादान योजनेअंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेऊन विवाह करणाऱ्या जोडप्यांना २० हजार रुपये अनुदान देण्यात येईल.

●सेवाभावी संस्था, केंद्र/राज्य शासकीय स्वायत्त संस्था, शासकीय प्राधिकरणे, सार्वजनिक प्राधिकरणे व जिल्हा परिषद यांनी आयोजित केलेल्या सामुहिक विवाह सोहळयांमध्ये केल्या जाणाऱ्या खर्चासाठी प्रति जोडपे ४ हजार रुपये  शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील.

*अधिक माहितीसाठी-सहायक आयुक्त समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, स.क्र. १०४/१०५, विश्रांतवाडी रोड, पोलीस स्थानकासमोर, येरवडा, पुणे-०६ (दू.क्र. ०२०- २९७०६६११)