पाटगाव धरणाचे पाणी घेऊन वीजनिर्मीती प्रकल्प उभारण्याच्या अदानींच्या हालचाली; राजू शेट्टी आक्रमक

मुंबई / जयसिंगपूर ( प्रतिनिधी) –  केंद्र सरकारच्या वरदहस्ताने अदानी उद्योग समूहाने कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगांव धरणातून पाणी घेऊन ८३४७ कोटीचा २१०० मेगावॅटचा वीजनिर्मीती प्रकल्प उभारण्याच्या हालचाली गतिमान केल्या असून येत्या २ अडीच वर्षांत शीघ्र गतीने प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे.पाटगाव धरणाचे पाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामार्गे समुद्राकडे वळवल्याने भुदरगड,कागल,शिरोळ सह कर्नाटक सीमाभागातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी कमी मिळणार आहे.

याशिवाय कराराप्रमाणे कर्नाटकला पाणी देण्यासाठी काळम्मावाडी व चांदोली धरणातून जादा पाणी द्यावे लागणार आहे. यामुळे राज्य सरकारने तातडीने बैठकीचे आयोजन करून सर्वपक्षीय कृती समितीसमोर शासनाने आपली भुमिका स्पष्ट करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे निवेदनाद्वारे केली.

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यासहित म्हैशाळ योजनेवर अवलूंबून असणाऱ्या शेतकऱ्यांनाही बसणार आहे केंद्र सरकारने अदानी उद्योग समुहाचे हित डोळ्यासमोर ठेऊन घेतलेल्या या निर्णयामुळे सांगली -कोल्हापूर सह सीमाभागातील शेजाऱ्यांना फटका बसणार आहे. एकीकडे इचलकरंजी शहरातील जनता पिण्याच्या थेंब थेंब पाण्यासाठी तडफडत असताना केंद्र सरकारने वास्तविक पाहता या धरणातून पिण्याचे पाणी,शेतीचे पाणी व उद्योगासाठी जे पाणी आरक्षित करण्यात आलेले आहे तसेच पुढील तीस वर्षाचे पाणी वाटप नियोजन या सर्व गोष्टींचा जलसंपदा अथवा राज्य सरकारकडून अभिप्राय न घेता अदानीच्या हितासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे.

एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक पाणीपुरवठा संस्था शेतीच्या पाणी परवाना मागणीसाठी गेल्या पाच- पाच वर्षापासून मंत्रालयात हेलपाटे मारत आहेत. याकडे ना महाविकास आघाडी सरकार ,ना महायुती सरकारमधील मंत्र्यांनी कार्यवाही केली. सदर प्रकल्प ज्याठिकाणी होणार आहे त्याला लागून वनविभागाचा इको सेन्सिटीव्ह झोन येतो. वनविभागाकडूनही या प्रकल्पास नाहारकत दाखला दिला गेलेला नाही. यामुळे तातडीने राज्य सरकारने याबाबतची आपली भुमिका स्पष्ट करण्याची गरज असून अशा पध्दतीने केंद्र सरकारने हिटलरशाही पध्दतीने भविष्यातील संकटांचा विचार व करता निर्णय घेणार असेल तर सदरचा प्रकल्प आम्ही जनआंदोलन ऊभे करून हाणून पाडणार असल्याचे सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

‘त्यांच्या विचारांमध्ये रामापेक्षा रावण प्रकर्षानं..’, रामाला मांसाहारी म्हणणाऱ्या आव्हाडांवर भाजपाची टीका

‘राम बहुजनांचे, ते मांसाहारी अन्न खात असत’, जितेंद्र आव्हाड यांचे विधान

अभिषेक बच्चनसोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या राय पोहोचली बागेश्वर बाबांच्या दरबारात