सत्ताधारीच बंद कसा पुकारु शकतात ?, महाराष्ट्र बंदविरोधात वकिलाची हायकोर्टात धाव

maharashtra band

मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसनेही सहमती दर्शवली आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर 11 ऑक्टोबरला बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, या बंद संदर्भात व्यापाऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहे.

दरम्यान, आता मुंबईतील एका वकिलाने आजच्या महाराष्ट्र बंदविरोधात मुंबई हायकोर्टाच्या सरन्यायाधीशांना विनंती अर्ज केला आहे. कोर्टाने या बंदबाबत स्वत: दखल घ्यावी अशी विनंती अॅडव्होकेट अटल बिहारी दुबे यांनी हायकोर्टाला केली आहे.

सत्तेत असलेल्या सरकारची जाबाबदारी सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत अधिकराचं रक्षण करण्याची आहे. मात्र महाविकास आघाडीतर्फे बंद पुकारण्यात आला आहे. म्हणून हायकोर्टाने स्वतः दखल घेत सामान्य जनतेच्या मूलभूत अधिकरांचं रक्षण करावं अशी मागणी अॅडव्होकेट अटल बिहारी दुबे यांनी मुंबई हायकोर्टाच्या प्रमुख न्यायाधीशांकडे केली आहे.

तर दुसरीकडे महाराष्ट्र बंद पुकारून महाविकास आघाडी सरकारने निव्वळ ढोंगीपणा केला आहे. या नेत्यांना शेतकर्‍यांप्रति खरोखर कणव असेल तर आजचा बंद मागे घेण्यापूर्वी विदर्भ आणि मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

हे देखील पहा 

https://www.youtube.com/watch?v=XjmHK3oCVPg&t=3s

Previous Post
bharati pawar

महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांच्या वेदना समजून घ्यायला राज्य सरकारला वेळ नाही पण…, भारती पवारांचा टोला

Next Post
pankja munde

भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्याच्या तयारीला वेग, स्वागतासाठी सावरगांव नगरी होतेयं सज्ज

Related Posts
Chandrahar Patil | "पळकुटू पळून गेले अन् मर्द शिवसेनेत आले", चंद्रहार पाटलांच्या प्रवेशामुळे उद्धव ठाकरेंची छाती फुलली

Chandrahar Patil | “पळकुटू पळून गेले अन् मर्द शिवसेनेत आले”, चंद्रहार पाटलांच्या प्रवेशामुळे उद्धव ठाकरेंची छाती फुलली

Double Maharashtra Kesari Chandrahar Patil | नुकताच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय रविंद्र वायकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ…
Read More
नरेंद्र मोदी

‘काम कमी आणि जाहिरात ज्यादा करत असलेल्या भाजपा सरकारने देशवासीयांना वाऱ्यावर सोडले आहे’

शिर्डी – काम कमी आणि जाहिरात ज्यादा असलेल्या भाजपा सरकारने देशवासीयांना वाऱ्यावर सोडले आहे अशी टीका  माजी मंत्री…
Read More
राज ठाकरे - मराठा आरक्षण मोर्चे

‘कुठे गेलं ते मराठा आरक्षण? लाखालाखाचे मोर्चे निघाले, काय झालं त्याचं?’ 

ठाणे – गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये राज ठाकरे यांची सभा पार पडली होती. या सभेत मनसे प्रमुख…
Read More