संभाजी महाराजांबाबत अजितदादांचं वादग्रस्त वक्तव्य; आता संजय राऊत यांची दातखीळ बसली आहे का? 

Pune – गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांचा अपमान हा कळीचा मुद्दा बनला समाहे. यातच आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या एक वक्तव्य सध्या चर्चेत असल्याचं पहायला मिळतंय. आपण जाणीवपुर्वक छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षक संभाजी महाराज म्हणतो. काही जण धर्मवीर म्हणतात. राजे धर्मवीर नव्हते, असं अजित पवारांनी (Ajit Pawar On Dharmaveer Sambhaji Maharaj )  म्हटले आहे.

छत्रपती संभाजी महाराजांना आपण स्वराज्यरक्षक म्हणतो, काही जण मात्र धर्मवीर म्हणतात. संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. संभाजी महाराजांनी कधीच कुठे धर्माचा पुरस्कार केला नाही. शिवाजी महाराजांनीही हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. यावर काही जण जाणीवपूर्वक धर्मवीर असे म्हणतात. मी मंत्रिमंडळात असताना, निर्णय घेताना सगळ्यांना सांगायचो की, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज असा उल्लेख आपण करावा, असे अजित पवार म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार स्वतःला जाणता राजा म्हणवून घेतात. खा. सुप्रिया सुळे  गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या ज्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक मजकूर आहे अशा पुस्तकाची जाहिरात करतातयामुळे पवार घराण्यावर आधीच शिवप्रेमी नाराज असताना आता अजित पवार हे संभाजी राजे धर्मवीर नव्हते, असं म्हणत आहेत. दरम्यान, या वादग्रस्त वक्तव्याचे आता पडसाद दिसू लागले आहेत.

यावरून आता  भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी अजित पवारांवर आंनी ठाकरे गटावर टीका केली आहे.  धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे हिंदू समाजाचे स्वाभिमान आहे, अस्मिता आहे असे म्हणत तुषार भोसले यांनी अजित पवार यांनी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत, त्यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही केली आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना प्रश्न करत आपली भूमिका बदलणार का? असा सवाल उपस्थित करत अजित पवार यांचा निषेध करणार का असा सवालही भोसले यांनी उपस्थित केला आहे. संजय राऊत यांची दातखीळ बसली आहे का? संभाजी महाराज यांनी धर्मासाठी बलिदान दिले, अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाला डाग लावलाय त्यावर संजय राऊत बोलणार का ? असा सवाल उपस्थित करून हल्लाबोल केला आहे.