‘पवारांना स्वतःच्या भरवश्यावर त्यांना 100 आमदारही कधी निवडणून आणता आलेले नाहीत’

यवतमाळ– राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल ठाण्यात बोलताना केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.अनेक राज्यांत ईडीचा गैरवापर किंवा तोडफेडीचे राजकारण करुन भाजपा सत्ता मिळवत असल्याची टीका त्यांनी केली होती. त्या टीकेला भाजपा प्रदेशाध्यक्षांनी उत्तर दिले आहे.

ज्यांचे संपूर्ण आयुष्य तोडफोडीत गेलं, ज्यांनी जेव्हा जेव्हा सत्ता मिळवली ती तोडफोडीतून मिळवली. त्या शरद पवारांच्या (Sharad Pawar) सर्टिफिकेटची पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi)गरज नाही, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे (BJP State President)यांनी केली आहे. पंतप्रधान मोदींनी 8 वर्ष मध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी काम केले आहे. याचे प्रमाणपत्र जनता देत आहे. शरद पवार यांच्या सर्टिफिकेटची मोदींना गरज नाही, असा टोला बावनकुळे यांनी लगावला आहे.

शरद पवार यांच्या पूर्ण आयुष्याचा इतिहास बघितला तर त्यांचे संपूर्ण आयुष्य तोडफोडीत गेले आहे, असे वक्तव्य बावनकुळे यांनी केले आहे. स्वतःच्या भरवश्यावर त्यांना 100 आमदारही कधी निवडणून आणता आलेले नाहीत, असेही बावनकुळे म्हणाले. शरद पवारांनी जेव्हा-जेव्हा सता मिळवली तेव्हा-तेव्हा ती तोडफोडीतून मिळवली. अशी टीकाही बावनकुळेंनी केली.