‘मविआच्या सभांना लोकही येत नाहीत, आता त्यांना मंगल कार्यालयात वज्रमूठ सभा घ्यावी लागेल’

मुंबई – उद्धव ठाकरे यांना स्वत:चा पक्ष सांभाळता येत नाही. ४० आमदार त्यांना सोडून गेले आहेत. आताही रोज त्यांना लोक सोडून जात आहेत, असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (State President of BJP Chandrasekhar Bawankule) यांनी लगावला. मविआच्या वज्रमूठला तडे गेले आहे. त्यांच्या सभांना लोक येत नाही, आता त्यांना मंगल कार्यालयात वज्रमूठ सभा घ्यावी लागेल.

ते नागपूर येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या पंतप्रधान मोदी यांच्यावरील आरोपांविषयी बोलताना म्हणाले, ज्यावेळी उध्दव ठाकरे आमच्या सोबत होते तेव्हा मोदींवर स्तुतीसुमने उधळीत होते, त्याचे आमच्याकडे रेकॉर्ड आहे. आता तुम्ही विरोधी लोकांसोबत गेल्याने आता तुम्हाला विरोध करणे भाग आहे. बारसूची जनता ठाकरे यांना तिथे येऊ देणार नाही.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सुरू असलेल्या घडामोडीविषयी ते म्हणाले, तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. शरद पवार कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतील, शेवटी त्यांना जो घ्यायचा ते तो घेतील. राष्ट्रवादीचा कुठलाही नेता आमच्या संपर्कात नाही. कोणीही संपर्क केलं नाही. कोणी आल् तर आमचा झेंडा आणि दुपट्टा तयार आहे.आम्ही कोणाला ये म्हणणार नाही. मात्र आम्ही संन्यासी नाही राजकीय पक्ष आहोत.

पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांनी कर्नाटक निवडणुकीत जय बजरंग बली चां नारा दिल्याचा आम्हाला अभिमान आहे. जेव्हा आम्हाला समज आली तेव्हापासून आम्ही हनुमान मंदिरात जातो. काँग्रेसने बजरंग दलाबाबत घेतलेला निर्णय याचा जनता मतांमधून उत्तर देईल. कर्नाटकमध्ये भाजपाला विजय मिळणारच आहे तर २०२४ च्या निवडणुकीत कॉंग्रेसला ईव्हीएममधून ४४० व्होल्टचा झटका लागणार आहे, असे ते म्हणाले.