‘तो’ हल्ला म्हणजे डरपोक लोकांनी सत्तेच्या भरवशावर केलेला उन्माद आहे – फडणवीस

मुंबई – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण ( Ran Couple Hanuman Chalisa Recite ) करणार असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता शिवसैनिकांनी भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला केला ( Shivsainik Attack Mohit Kamboj Car ) आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीसमोर हा हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे. मोहित कंबोज इथे आलाच कसा, असा संतप्त सवाल शिवसैनिकांनी विचारला आहे.

दरम्यान, या हल्ल्यानंतर आता शिवसेनेवर गुंडगिरीचा आरोप होऊ लागला आहे. यातच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी या मुद्यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, मोहित भारतीय यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे डरपोक लोकांनी सत्तेच्या भरवशावर केलेला उन्माद आहे. महाराष्ट्रात सरकारच्या भ्रष्टाचारावर बोलाल तर तुम्हाला जिवे मारू, ही नवीन संस्कृती सुरू झाली आहे. पण तरीही महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराविरुद्ध हा लढा थांबणार नाही.

आता मुंबई पोलिस या हल्लेखोरांवर कारवाई करणार की एखादे कथानक रचून, या भेकड हल्लेखोरांना वाचविणार? मुंबई शहरात आपण सीसीटीव्हीचे जाळे सर्वत्र उभारले आहे, त्यातून संपूर्ण सत्य बाहेर येईलच. या हल्ल्याचा तीव्र निषेध करताना दोषींवर कठोर कारवाईची आमची मागणी आहे.असं ते म्हणाले.