एकनाथ खडसे देवेंद्र फडणवीसांना म्हणाले, ‘जे काही आहे ते सगळं मिटवून टाकू…’

मुंबई : माजी मंत्री एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) भाजपला (BJP) सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करून आमदारकी पदरात पडून घेतली आहे. पण आता हेच खडसे आता पुन्हा एकदा स्वगृही परतण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आता पुन्हा एकदा नव्याने सुरु झाली आहे आणि या चर्चेला करण ठरला आहे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी खडसेंबाबत केलेला दावा.

गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंच्या मोठा दावा केलाय. ‘मिटवण्याच्या’ मुद्द्यावर त्यांनी भाष्य केलंय. “मी आणि देवेंद्रजी बसलो होतो. तिथे खडसे आले आणि त्यांनी म्हटलं की आपण तिघं बसू. जे काही आहे ते सगळं मिटवून टाकू… त्यांच्या मनात नेमकं काय आहे? हे स्पष्टपणे कळू शकलं नाही. कारण आम्ही बसलो तिथे खूप गर्दी होती. तिथं त्यांना विचारता आलं नाही की नेमकं काय मिटवायचंय ते?”, असं म्हणत महाजनांनी खडसेंबाबत मोठा दावा केलाय.