‘तो’ होता विवाहित पण ‘तिने’ लग्नाचा तगादाच लावला, मग काय त्याने कायमचाच काटा काढला !

मुंबई : कल्याणचा सागर आणि मुलुंडची प्रतिभा हे एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले होते. सागर कल्याणचा रहिवाशी पण सध्या बेरोजगार होता. तर, मुलुंडची प्रतिभा ही एका रुग्णालयात नर्स होती. गेल्या पाच वर्षांपासून सागर आणि प्रतिभा यांच्यात प्रेमसंबंध होते. पण खरी गोम ही होती की सागर हा विवाहित असून दोन मुलाचा बाप होता. पण तरीही प्रतिभा नेहमीच सागरकडे लग्नासाठी तगादा लावत असे.

प्रतिभाच्या रोजच्या तगाद्याने सागर पुरता वैतागला होता. रोज होणाऱ्या या त्रासातून कायमचा मार्ग काढण्याच्या दृष्टीने सागरने अखेर टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी बुधवारी रात्री तुर्भे येथील साई प्रणव लॉजवर आरोपी सागरने प्रेयसी प्रतिभाला बोलावले होते. दोघांनी संपूर्ण रात्र या लॉजवर घालवण्याचा निर्णय घेतला होता. रात्र सरली मात्र, सकाळी दोघांमध्येही प्रचंड भांडण सुरू झाली.

यादरम्यान सागरने प्रेयसी प्रतिभाचा गळा आवळून खून केला आहे. लॉज चालक वरती रूममध्ये जाऊन पाहिले असता प्रतिभा बेशुद्धावस्थेत पडली होती. लॉज चालकाने प्रतिभाला रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आहे. यावेळी पोलिसांच्या तावडीतून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या सागरला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेत त्याची अधिक चौकशी केली असता. लग्नाचा तगादा लावत असल्याने आपणच प्रतिभाचा गळा आवळून खून केला असल्याची कबुली दिली असल्याची कबुली त्यांनी यावेळी दिली आहे.