मला लोकांची विकास कामे करायची आहेत – प्रताप सरनाईक

मुंबई – आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मला विकास करायचा आहे. मी मीरा – भाईंदरचा विकास करणार असं सरनाईक यांनी म्हटलं आहे. या सुषमा अंधारे कोण आहेत? ज्यांनी काल पक्षात प्रवेश केला आणि आज बोलत आहेत. असं म्हणत टीका केली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, पक्षात येण्यापूर्वी त्यांनी अनेकदा शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांवर टीका केली आहे. अशी जर एखादी व्यक्ती मीरा-भाईंदर शहरात येऊन काहीही बोलत असेल तर ते चुकीचं आहे. सुषमा अंधारे यांनी आधी आपला इतिहास पहावा. आपण इथपर्यंत कशा पोहोचलो, आपण कोणाबद्दल बोलत आहोत याचा अंधारे यांनी विचार करावा असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.