मविआचे मंत्रीच माथी भडकाविणार असतील तर दंगलीची जबाबदारी राज्य सरकारची!

मुंबई – त्रिपुरात ज्या घटना घडल्याच नाहीत, त्यावर महाराष्ट्रात प्रतिक्रिया उमटणे, हे अतिशय दुर्दैवी आहे. महाविकास आघाडी सरकारचे मंत्रीच जर लोकांची माथी भडकाविणारी, चिथावणी देणारी विधाने भर मंचावरून करीत असतील, तर या दंगलीची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची असेल, असे सांगत सर्वांनी शांतता पाळण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्रिपुरात ज्या घटना घडल्याच नाहीत, त्यावर महाराष्ट्रात प्रतिक्रिया उमटणे हे दुर्दैवी आहे. त्रिपुरा सरकार आणि तेथील पोलिसांनी यासंदर्भात संपूर्ण माहिती दिलेली आहे. जी मशिद जाळली गेली, असा आरोप केला आहे, तशी मशिद जाळण्याची कोणतीही घटना झालेलीच नाही. त्या मशिदीचे फोटो सुद्धा जारी करण्यात आले. त्यामुळे केवळ खोटा प्रचार केला गेला.

ज्यांनी खोटा प्रचार केला, त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात आली. पण, निव्वळ अफवेवर मोर्चे काढण्यात आले. जाळपोळ करण्यात आली आणि हिंदूंची दुकाने जाळली गेली. अमरावतीतील घटनाक्रम हा अस्वस्थ करणारा आहे. हा एका सुनियोजित षडयंत्राचा भाग वाटतो. अशात राज्य सरकारमधील मंत्रीच जर भावना भडकावित असतील, तर हे अधिकच गंभीर आहे. अशात वातावरण चिघळल्यास दंगलींची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारवर असेल. सर्वांनी शांतता पाळावी, हे माझे सर्वांना आवाहन आहे असं फडणवीस म्हणाले.

https://youtu.be/iLGbybjU9tc

Previous Post

कंगणा राणावत विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – नसिम खान

Next Post

पिंपरी चिंचवड येथील सायन्स पार्क येथे होणार बालदिन साजरा

Related Posts
पंतप्रधान मोदींची खाजगी सचिव बनलेल्या निधी तिवारी कोण आहेत?, बनारसशी आहे संबंध

पंतप्रधान मोदींची खाजगी सचिव बनलेल्या निधी तिवारी कोण आहेत?, बनारसशी आहे संबंध

निधी तिवारी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Nidhi Tiwari) यांच्या खाजगी सचिव (पीएस) म्हणून निवड झाली आहे. अलीकडेच…
Read More
rahul gandhi

‘लग्नही होईना आणि सत्ताही मिळेना म्हणून राहुल गांधी हताश झाले आहेत’

नवी दिल्ली-  जहांगीरपुरीमध्ये भाजपशासित एमसीडीच्या कारवाईनंतर विरोधक सातत्याने हल्लाबोल करत आहेत. याबाबत काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांनीही…
Read More
Balasaheb thorat

महाविकास आघाडी निवडणूकीला घाबरत नाही, आम्ही निवडणूकीला तयारच आहोत – थोरात 

मुंबई – ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून (OBC Political Reservation) सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला दणका दिला आहे. राज्य सरकारनं केलेला…
Read More