‘इंडिया’ आघाडीत या देशातील भाजपाविरोधी नाही, तर देशभक्त पक्ष एकत्र आले आहेत – राऊत

Sanjay Raut : ‘इंडिया’ (INDIA) आघाडीच्या मुंबईतील ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला होणाऱ्या बैठकीच्या तयारीला वेग आला आहे. ही अत्यंत महत्त्वाची बैठक आहे. या देशातील भाजपाविरोधी नाही, तर देशभक्त पक्ष एकत्र आले आहेत.असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

देशात भाजपाविरोधी पक्षांवर सातत्याने कारवाई सुरू आहे. काल आपण झारखंड, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमध्ये अशा धाडी टाकण्यात आल्या. महाराष्ट्रातही तेच सुरू आहे. यांना दुसरं काही दिसत नाही. अशी टीकाही त्यांनी केलीय.

आपल्या विरोधकांचा निवडणुकीत पराभव करता येणार नाही, लोकशाही मार्गाने पराभव करता येणार नाही म्हणून निवडणुकीच्या आधीच विरोधकांना खोट्या खटल्यात अडकवून तुरुंगात टाकण्याचं काम सुरू आहे.असा आरोप देखील खासदार राऊत यांनी केला.