‘देशात कुठेच भाजपचा अश्वमेध कुणी रोखला नाही मात्र पवारसाहेबांनी अशक्य ते शक्य करून दाखवलं’

मुंबई – मागील पाच वर्ष विरोधात काढली त्यानंतर झालेल्या निवडणुकीत ५४ आमदार निवडून आणले. आदरणीय शरद पवार (Sharad Pawar) साहेबांच्या विचाराने, कल्पकतेने, दूरदृष्टीने राज्यात नवीन सरकार स्थापन झाले. हे आव्हान दिल्लीतील लोकांना आवडले नाही व पहिल्या दिवसापासून आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न सर्व मार्गांनी झाला. देशात कुठेच भाजपचा अश्वमेध (BJP’s Ashwamedh) कुणी रोखला नाही मात्र पवार साहेबांनी अशक्य ते शक्य करून दाखवत राज्यात सेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तीन पक्षाचे सरकार स्थापन केले व कृतीतून दिल्लीपुढे महाराष्ट्र झुकणार नाही हा विश्वास निर्माण केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितले.

काल राष्ट्रवादी काँग्रेसची राज्य कार्यकारिणीची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे पार पडली. यावेळी बोलताना ते म्हणाले, आता अडीच वर्षे विरोधी पक्षाची भूमिका चांगल्याप्रकारे बजावली तर पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी (NCP) हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उभा राहिल असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.