“तुरुंगात असताना फक्त सावरकरांमुळे…”, अभिनेत्री केतकी चितळेचे लक्षवेधी वक्तव्य

अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) आणि वाद हे समीकरण जणू ठरलेलेच आहे. केतकी नेहमी तिच्या वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत असते. गेल्यावर्षी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने तिला जेलची हवा खावी लागली होती. आता स्वातंत्र्यवीर सावकरांच्या (Savarkar Jayanti) जयंतीनिमित्त त्या आठवणींना उजाळा देत केतकीने मोठे वक्तव्य केले आहे.

केतकी म्हणाली, “जेव्हा कागद आणि पेन नसते, तेव्हा काही लिहिण्याचा विचार काही वर्षे माझ्या मनात आला नाही. पण मला माहित होते की ते शक्य आहे, पण गरज वाटली नाही. गेल्या वर्षी मला तुरुंगात टाकले होते तेव्हा मी पाठांतर करत फक्त सावरकरांना डोळ्यांसमोर ठेवून रोज एक वही आणि पेन वापरायचे. ते मिळेपर्यंत खूप गोष्टी आठवल्या. मी असा कधीही विचार केला नव्हता मी त्यांच्याकडून ही गोष्ट शिकेन.”