मुंबईच्या डबेवाल्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवू : मंगलप्रभात लोढा

मुंबई – मुंबईतील डबेवाल्यांचे सर्व प्रश्न आणि मागण्या तातडीने पूर्ण करण्यासाठी प्राधान्याने सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही कॅबिनेट मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांनी दिली. ‘हर घर तिरंगा’ या अभियानाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी डबेवाला संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके आणिपदाधिकाऱ्यांची भेट घेतली.

मंगलप्रभात लोढा म्हणाले, मुंबईत नैसर्गिक आपत्ती, दहशतवादी हल्ले, कोरोना अशी अनेक संकटे आली तरी डबेवाले या संकटाना नेटाने सामोरे गेले आहेत. त्यामुळे डबेवाल्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला अधिक प्राधान्य देवू अशी हमी मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांनी दिली. यावेळी मुंबई भाजपा उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी आणि पदाधिकारी उपस्थित होते.