मनसे बिनबुडाची झालीय, मनसेला बुड नाही आणि शेंडाही नाही – अरविंद सावंत 

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने (MNS ) गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये (Shivaji park)पाडवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray), राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (sharad pawar) यांच्यावर तसेच महाविकास आघाडीला देखील फैलावर घेतले.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून महाविकास आघाडीच्या ढोंगीपणाचा अक्षरशः बुरखा फाडला. सोबतच राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्था आदी प्रश्नांवरून महाविकास आघाडीचे वाभाडे काढले.यावेळी बोलताना त्यांनी जातीवादाच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच राज्यात जातीवाद फोफावला असा आरोप शरद पवारांवर गंभीर आरोप केला.

दरम्यान, राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीला धुतल्यानंतर आता महाविकास आघातील तमाम नेते मनसे आणि राज ठाकरे यांच्यावर तुटून पडले आहेत.  यातच आता शिवसेनेने पुन्हा एकदा मनसेला लक्ष्य केले आहे. महाविकास आघाडीवर टीका करणारी मनसे (mns) ही बिनबुडाची झाली आहे. तिला बुडही नाही आणि शेंडाही नाहीये. मनसेचा झेंडा बदलला तसा त्यांचा विचारही बदलला आहे. लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे आता भाजपचे कॉन्ट्रॅक्टर झाले आहेत, अशी खोचक टीका शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी केली आहे.