‘देवेंद्र फडणवीस केवळ आकडेवारी फेकतात, पण सत्य परिस्थिती ते जनतेपासून लपवतात’

Amol Kolhe – देशातील सरकार केवळ उद्योगपतींचे कर्ज माफ करते, पण येथील कष्टकरी जनतेचे दु:ख त्यांना दिसत नाही. सरकार मुद्यांचे बोलत नाही, त्यामुळे जनतेचे महत्त्वाचे प्रश्न भरकटत आहेत. पालकमंत्री हे मालकमंत्री झालेत आहे.  राज्यातील सरकार एक फूल, दोन डाउनफूल सरकार असा खासदार अमोल कोल्हे यांनी हल्लाबोल केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वतीने शेतकऱ्यांच्या मागण्यांकरिता आक्रोश मोर्चा सुरू आहे.  यात बोलताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) केवळ आकडेवारी फेकतात, पण सत्य परिस्थिती ते जनतेपासून लपवत आहेत. दरम्यान गेले २२ दिवस देशात कांदा निर्यातीवर बंदी आहे. पण सरकारमधील एकही नेता यासाठी दिल्लीतील सरकारला डोळ्यात डोळे घालून प्रश्न करत नाही, निर्यात बंदी मागे घेण्याची मागणी करत नाही, असे देखील अमोल कोल्हे म्हणाले.

अमोल कोल्हे म्हणाले की, रामाचे नाव मनात ही घेतले तरी चालेल, अन् आयोध्येतही जाऊन घेतले तरी चालेल. रामाचा मक्ता कोण घेतंय हे देशातील जनता पाहतंय असेही खासदार अमोल कोल्हे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिर्डीत ३ जानेवारीला कार्यकर्ता शिबिर; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माहिती

निधीतील घसरणीवर मात करण्यासाठी काँग्रेसने स्वीकारला क्राऊड फंडिंगचा मार्ग, जाणून घ्या कसा मिळतोय प्रतिसाद

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला स्वातंत्र्यापूर्वीचे दिवस परत आणायचे आहेत’

मोदींची हुकूमशाही रोखायला एकत्र या! प्रकाश आंबेडकर यांचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना पत्र!