राजू शेट्टी महाआघाडीतून नव्हे, साखर सम्राटांच्या जाळ्यातून बाहेर पडले – निखील वागळे

मुंबई – माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी ( Raju Shetty ) आता महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे. शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीत ही घोषणा केली. आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं.

निवडणूक लढवता यावी म्हणून आपण चळवळ उभा केली नाही. तर चळवळ टिकवी म्हणून आपण निवडणुकीचा मार्ग स्वीकारला असं राजू शेट्टी म्हणाले. सध्या भाजप ( BJP )सोबत जाण्याचा विचार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेला नाही असंही ते म्हणाले.

दरम्यान, या घडामोडी घडत असताना पत्रकार निखील वागळे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, राजू शेट्टी महाआघाडीतून नव्हे, साखर सम्राटांच्या जाळ्यातून बाहेर पडले. आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी लढणार. माझ्या त्यांना शुभेच्छा! असं वागळे यांनी म्हटले आहे.