महाराष्ट्र बंद हा राजकीय नसून शेतकऱ्यांप्रती संवेदना दाखवणारा आहे – संजय राऊत

Sanjay Raut On Farmers Protest

मुंबई : लखीमपूर हिंसाचार प्रकरणावरुन महाविकास आघाडी सरकारनं आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे. या हिंसाचाराच्या निषेधात 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलीय. हा बंद महाविकास आघाडी सरकारकडून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेनं पुकारण्यात आल्याचं जयंत पाटील यांनी काल सांगितलं होतं. तसंच अन्य मित्र पक्षांशीही बोलणं सुरु असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

त्यांनतर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘येत्या 11 ऑक्टोबर रोजी होणारा महाराष्ट्र बंद हा राजकीय नसून संवेदनशीलतेसाठी आहे. शेतकऱ्यांप्रती संवेदना दाखवणारा आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठी आहोत हे दाखवून देण्यासाठी आहे. तसेच लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसेचा धिक्कार करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे, असं सांगतानाच या घटनेतील आरोपींना सरकार का वाचवत आहे? कुणासाठी वाचवत आहे.’ असा थेट सवाल करत संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या या भूमिकेवर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली आहे. कॅबिनेट बैठकीत लखीमपूर हिंसाचाराबाबत खेद व्यक्त केला हे ठीक. पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आक्रोश त्यांच्या कानी पोहोचला नाही का? त्यांचे कैवारी ते झाले नाहीत. अद्याप मदतीचा निर्णय घेतला नाही, असा खोचक टोलाही फडणवीसांनी लगावला आहे.

तर, दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर भाजप आंदोलन करेल. उत्तर प्रदेशात काय झालं हे तिथलं सरकार काम करेल. इथे शेतकरी मरत आहेत. त्यावर हे काही बोलत नाही, अशी टीकाही फडणवीसांनी केलीय.

हे ही पहा:

https://www.youtube.com/watch?v=5wWKfxFFi5c

Previous Post
Yogita Borate

गायिका ‘योगिता बोराटे’ यांचे नवरात्रीनिमित्त खास गुजराती गाणे रिलीज

Next Post
sattar - sabane

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसैनिक गद्दारांचा मुडदा पाडतील – अब्दुल सत्तार

Related Posts
विराट कोहलीचे 'विक्रमतोड' शतक, सचिन तेंडूलकरला मागे टाकत बनला जगातील पहिला फलंदाज

विराट कोहलीचे ‘विक्रमतोड’ शतक, सचिन तेंडूलकरला मागे टाकत बनला जगातील पहिला फलंदाज

india vs pakistan: आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम चार गटातील सामन्यात भारतानं पाकिस्तानवर 228 धावांनी दणदणीत विजय मिळवला.…
Read More
चित्रपट सृष्टीतील छोट्या कलाकारांच्या प्रश्नांवर लवकरच तोडगा काढू, फुंडकर यांचे आश्वासन

चित्रपट सृष्टीतील छोट्या कलाकारांच्या प्रश्नांवर लवकरच तोडगा काढू, फुंडकर यांचे आश्वासन

Akash Fundkar | चित्रपट सृष्टी आणि दूरचित्रवाणी (टी व्ही) छोट्या कलाकारांच्या वेगवेगळ्या मागण्यांबाबत मंत्रालयात बैठक झाली लवकरच तोडगा…
Read More
amruta fadnvis - rupali chaknakar

‘संवेदनाहिन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी’

मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. महाविकास आघाडीतील…
Read More