काही लोक म्हणायचे की राम मंदिर बांधले तर आग लागेल, पण राम वाद नाही उपाय आहे- PM Modi
Ram Mandir Pranpratishtha: अयोध्येत एका भव्य सोहळ्यात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘प्राण प्रतिष्ठा’शी संबंधित सर्व विधी पार पाडले. या विशेष प्रसंगी, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत गर्भगृहात उपस्थित होते. मनोरंजन, क्रिकेट आणि उद्योग जगतातील शेकडो लोकांनी हे मंदिर परिसरात पाहिले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ऋषी-मुनींनाही आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमानंतर पीएम मोदींनी (PM Narendra Modi) प्रभू रामाला साष्टांग नमस्कार घातला. ते आपल्या भाषणात म्हणाले की, राम म्हणजे अग्नी नसून ऊर्जा आहे. राम हा वाद नाही, तो उपाय आहे.
विरोधी पक्षांचे नाव न घेता पीएम मोदी म्हणाले, “तोही एक काळ होता जेव्हा काही लोक म्हणायचे की राम मंदिर बांधले तर आग लागेल. अशा लोकांना भारताच्या सामाजिक भावनेची शुद्धता समजू शकली नाही. रामललाच्या या मंदिराचे बांधकाम भारतीय समाजाच्या शांतता, संयम, परस्पर सौहार्द आणि समन्वयाचे प्रतीक आहे. हे बांधकाम आगीला जन्म देत नसून ऊर्जेला जन्म देत असल्याचे आपण पाहत आहोत.” असे मोदींनी आपल्या भाषणात म्हटले.
महत्वाच्या बातम्या-
Ram Mandir Ayodhya : संपूर्ण पुणे शहर बनले राममय; धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांचं आयोजन
Ram Mandir Ayodhya : रामाने रावणाचा नि:पात करण्याचा निश्चय केला त्या मंदिरात मोदींनी केली महापूजा
Santosh Shelar | माओवाद्यांशी संबंधित पुण्यातील बेपत्ता संतोष शेलार परतला; रुग्णालयात दाखल