बाळासाहेब असते तर दोघांनाही शंभर उठाबश्या काढायला लावल्या असत्या; ‘त्या’ मुलाखतीवर मनसेची खोचक टीका 

Mumbai – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former Chief Minister Uddhav Thackeray)  यांनी दैनिक ‘सामना’ला परखड मुलाखत दिली आहे. खासदार आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या राज्यातील आणि देशाच्या राजकारणावर भाष्य केलं. इंडिया आघाडीवर आपली भूमिका मांडली. तसेच इर्शाळगड दुर्घटनेवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. याच मुलाखतीतून उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि  शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.

दरम्यान,  याच मुलाखतीवरून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी टीकास्त्र सोडले आहे. जे भाषणात तेच विधानसभेत तेच पत्रकार परिषेदेत आणि तेच मुलाखतीत नवीन काहीच नाही असो आज मा.बाळासाहेब असते तर दोघांनाही शंभर उठाबश्या काढायला लावल्या असत्या अशी टीका करत देशपांडे यांनी ठाकरेंच्या मुलाखतीची खिल्ली उडवली आहे.