‘ईडी-सीबीआयला घाबरण्याची गरज नाही, 2024 मध्ये भाजपचा पराभव निश्चित आहे’

satyapal malik : लोकसभा निवडणूक 2024 आणि विरोधकांच्या एकजुटीवरून देशभरात सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. विरोधी नेत्यांना त्यांनी ईडी आणि सीबीआयची काळजी करण्याची गरज नसल्याचे सांगत या संकटाला धैर्याने सामोरे जाण्याचा सल्ला दिला आहे.

ते म्हणाले, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव निश्चित आहे. आगामी निवडणुकीत भाजपचे सरकार टिकणार नाही. मग मोदीजी आणि त्यांच्या साथीदारांची चौकशी करा. आता तुम्ही केंद्र सरकारच्या या एजन्सींना धैर्याने सामोरे जा. सहा महिन्यांनंतर त्यांचा पराभव निश्चित आहे. त्यानंतर अधिकाऱ्यांनाही वाटेल की, आता वेळ निघून गेली आहे, त्यामुळे काहीही करण्याची गरज नाही. त्यानंतर सत्तेत बसलेल्या भाजपच्या लोकांचीच चौकशी होईल.