कोल्हे साहेबांच्या जाण्याने सहकार व शिक्षण क्षेत्राचे न भरून येणारे नुकसान झालंय – गडाख

अहमदनगर : माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे १६ मार्च रोजी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. शंकरारराव कोल्हे यांनी सहकाराच्या माध्यमातून संजीवनी सहकारी साखर कारखान्याची पायाभरणी केली आणि तेथूनच खऱ्या अर्थाने या शेतकऱ्याला समृद्ध करण्याचा वसा त्यांनी घेतला. त्यांचा अंत्यवविधी आज सायंकाळी साडेचार वाजता संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेज येथे होणार आहे.

कोपरगाव येथील संजीवनी सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ शंकरराव कोल्हे यांनी रोवली. सहा दशकात त्यांना महसूल, कृषी, परिवहन, उत्पादन शुल्क या मंत्रिपदावर काम करण्याची संधी मिळाली.त्या संधीचे त्यांनी सोनं केलं. शंकरराव कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात होते. त्यांच्या जाण्यानं तालुक्यात शोककळा परसली आहे. सहकारातील महान व्यक्तीमत्वाचा अंत झाल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.

शंकरराव कोल्हे यांना जलसंधारणमंत्री शंकराव गडाख यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. ‘माजी मंत्री, सहकार व शिक्षण क्षेत्रातील जेष्ठ नेते शंकररावजी कोल्हे साहेब यांचे निधन झाल्याची दुःखद वार्ता समजली.त्यांच्या जाण्याने सहकार व शिक्षण क्षेत्राचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.या दुःखद प्रसंगी आम्ही सर्व कोल्हे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.’ अशा भावना गडाख यांनी व्यक्त केल्या