राज्यभरात जेवढे मनसेचे कार्यकर्ते, तेवढेच रस्त्यावर खड्डे, म्हणून…; दिपाली सय्यद यांचा हल्लाबोल

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने (MNS) महाराष्ट्रातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा मुद्दा उचलून धरला आहे. मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली मनसेकडून रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी ‘जागर यात्रा’ काढली जाणार आहे. यावरून अभिनेत्री व शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी टीका करताना मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाके आणि गाड्या फोडण्यापेक्षा खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घ्यावी, असा खोचक सल्ला दिला.

ट्वीट करत दिपाली सय्यद (Deepali Sayed) म्हणाल्या, “मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाके आणि गाड्या फोडण्यापेक्षा खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घ्यावी. राज्यभरात जेवढे मनसेचे कार्यकर्ते आहेत, तेवढेच रस्त्यावर खड्डे आहेत. हे दोन दिवसांचं काम आहे. उगाच तुरुंगामध्ये महिनाभर खाऊन देशाचे नुकसान आणि बाहेर स्टंटबाजी करून पण! युवा नेत्यांना घराबाहेर काढून कामाला लावा.”