उद्धव ठाकरे, तुम्ही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेले नाहीत; सहनशीलतेचा अंत पाहू नका : राज ठाकरे

मुंबई: मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेले मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिलं आहे. राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा राज यांनी पत्राद्वारे दिला आहे. सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही, असं राज ठाकरेंनी या पत्रात नमूद केलं.