शिवसेना ठाकरे गटाकडून भव्य ‘संविधान बचाव’ टू व्हिलर रॅली; ‘संविधान के सन्मान में, शिवसेना मैदान में’

पुणे : भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३२ व्या जयंतीच्या (Ambedkar Jayanti) निमित्ताने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यातर्फे महात्मा फुले वाडा ते डॅा.आंबेडकर आंबेडकर पुतळा पुणे स्टेशन अशी भव्य ‘संविधान बचाव’ टू व्हिलर रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या प्रमाणात शिवसैनिक सहभागी झाले.शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे,उपशहर प्रमुख  डॅा.अमोल अशोक देवळेकर,गजानन थरकुडे ,माजी नगरसेवक विशाल धनवडे,माजी नगरसेविका पल्लवी जावळे,अनिल दामजी,संतोष सोनवणे,रुपेश पवार,राहूल जेकटे,उत्तम भुजबळ,पद्मा सोरटे,अतुल गोंदकर,किसन लोखंडे,भगवान वायाळ,संदिप गायकवाड,चंदन साळुंखे,शेखर जावळे यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.टू व्हिलर रॅलीचे नियोजन युवासेना शहर प्रमुख सनी गवते,युवराज पारिख,अक्षय फुलसुंदर आदींनी केले होते.या प्रसंगी कसबा विधानसभेचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी “महा विकास आघाडीच्या वतीने संविधानाच्या सन्मानार्थ आणि भारतीय लोकशाहीच्या बचावासाठी  कटिबद्ध आहोत  आणि आम्ही सारे संघर्षरत राहू” अशी शपथ सर्वांसोबत  घेतली. ‘संविधान के सन्मान में,शिवसेना मैदानमें’ या तसेच डॉ आंबेडकरांच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यात आल्या.

शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले,’डॉ आंबेडकर हे महामानव आहेत.त्यांचे विचार लोकशाहीचे विचार आहेत, ही लोकशाही व्यवस्था धोक्यात असताना त्यांचे विचार आम्ही घराघरात पोहोचविणार आहोत. लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी आम्ही वाटेल ती किंमत मोजायला,लढायला तयार आहोत.

या प्रसंगी बोलतांना शिवसेना उपशहर प्रमुख (ठाकरे गट) डॅा.अमोल अशोक देवळेकर यांनी भूमिका मांडली . ते म्हणाले,”आजचा हा दिवस देशभरात जल्लोषात साजरा केला जातो.  परंतू आज भारताचा विचार केला असता तर जी मूल्य-विचार-संस्था रुजवल्या जोपासल्या त्या उभ्या राहण्यासाठी आयुष्यभर अविरतपणे संघर्ष केला ती मुल्ये-ती विचारसरणी धोक्यात आलेली दिसत आहे.भारताच्या संविधानिक चौकट ही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची देणगी आहे. परंतू, आजचे राज्यकर्ते ही चौकटच उध्वस्त करायला निघाले आहेत.संसदेचे सार्वभौमत्व धोक्यात आलेले आहे.न्यायव्यवस्थेवर  प्रश्नचिन्ह उभे रहात आहे.स्वायत्त तपास यंत्रणा या राजकीय स्वार्थापोटी दावणीला बांधल्या गेल्यात.‘विकेंद्रित लोकशाही’ हे आपलं वैशिष्ट्य असताना त्याला मूठमाती देऊन केंद्रीय पद्धतीची हुकूमशाही किंवा अध्यक्षीय लोकशाहीकडे देशाची वाटचाल कधीच सुरू झाली आहे.ज्या पद्धतीनं गेल्या आठ वर्षांत भारतीय लोकशाही धोक्यात आली आहे ते बघता आगामी काळामध्ये ‘संविधान बचाव’साठी सर्वसामान्य जनतेला रस्त्यावर उतरावं लागेल.

‘बाबासाहेबांच्या संघर्षाने आपल्याला बहाल केलेली लोकशाही मूल्ये धोक्यात आलेली असतांना त्यांची जयंती फक्त जल्लोषात साजरे करणे हे पुरेसे ठरणार नाही तर त्यांनी दिलेली मूल्ये,त्यांनी दिलेला विचार जोपासणे आणि त्यांनी दिलेली ‘संवैधानिक चौकट ‘ शाबुत राहील यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणे, हीच बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल”,असेही ते म्हणाले.