ग्राम विद्युत व्यवस्थापकांना मोठा दिलासा; मानधनात २ हजार रुपयाची वाढ

मुंबई : थंडी, उन, वारा, पाऊस या अस्मानी संकटात मानधनावर काम करणाऱ्या राज्यातील ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात वाढ करण्याचे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी महावितरणला दिले आहे.

ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांनी ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या कामाचे स्वरूप पाहून म.रा.वि.मं. सुत्रधारी कंपनीच्या कार्यालयामध्ये नुकतीच बैठक घेतली. या बैठकीस महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे व संचालक (प्रकल्प/मासं) भालचंद्र खंडाईत उपस्थित होते.

तीन हजार लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये महावितरणकडून काही सेवा पुरविण्यासाठी फ्रेन्चायझी तत्त्वावर ग्राम विद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना प्रतिमाह ३ हजार रुपये मानधन देण्यात येत होते. कामाच्या तुलनेत मानधन कमी असल्यामुळे ग्राम विद्युत व्यवस्थापकांनी ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांच्याकडे मानधनात वाढ करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात २ हजार रुपयाची वाढ करण्यात आली असून याचा लाभ राज्यातील ५०० हून अधिक ग्राम विद्युत व्यवस्थापकांना मिळणार आहे. शुक्रवार (दि.२६) पासून ही वाढ लागू झाली आहे.

ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांनी ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात केलेल्या वाढीबाबत ग्राम विद्युत व्यवस्थापक अण्णासाहेब चौभे, महेश तुपे व इतर ग्रामविद्युत व्यवस्थापकांनी ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांचे आभार व्यक्त केले आहे.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post
गायत्री दातार ठरली उत्तम कॅप्टन आणि टास्क संचालक

गायत्री दातार ठरली उत्तम कॅप्टन आणि टास्क संचालक

Next Post

‘दिल्ली ते गल्ली भाजपच्या जाहिरातींमध्ये होत असलेला फर्जीवाडा हा वारंवार समोर येत आहे’ 

Related Posts
चांदणी चौक

चांदणी चौकात प्रवास करताय? जाणून घ्या हा वाहतुकीतील बदल

पुणे : मुंबई- बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौकातील जुना पूल येत्या १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार…
Read More
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी केली विदर्भ- मराठवाड्यातील अतीवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतांची पाहणी | Heavy Rain

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी केली विदर्भ- मराठवाड्यातील अतीवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतांची पाहणी | Heavy Rain

राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळं (Heavy Rain) शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री…
Read More

राजकारणात कशासाठी राहता, घरी जा घरी, स्वयंपाक करा; चंद्रकांत पाटलांची सुप्रिया सुळेंवर खोचक टीका

मुंबई – सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरलं आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी चांगलेच अडचणीत…
Read More