शेतक-यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई देण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील – गडाख

शेतक-यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई देण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील - गडाख

उस्मानाबाद – राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा चांगलाच फटका बसला आहे. मराठवाडा, प. महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ या भागात अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकारने मदत जाहीर केली आहे मात्र घोषित करण्यात आलेली मदत अतिशय तुटपुंजी असल्याची टीका शेतकरी आणि विरोधक करत आहेत.

दरम्यान, शेतक-यांना समृद्ध करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून अतिवृष्टीमुळे शेतक-यांच्या झालेल्या नुकसानाची राज्य शासनाला जाणीव आहे त्यामुळे शेतक-यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई देण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे असं प्रतिपादन मृदा आणि जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे संपर्क मंत्री शंकरराव गडाख यांनी कळंब तालुक्यातील खोंदला इथं काल केलं.

उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी आणि कळंब तालुक्यातील कोल्हापुरी बंधा-यांच्या पाहणी दौऱ्याप्रसंगी ते बोलत होते. तेरणा आणि मांजरा नदीवरील 24 प्रकल्पांची एकाचवेळी दुरुस्ती करण्याचा शासनाचा मानस असून सर्व 24 प्रकल्पांचं सर्वेक्षण करण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. त्यासाठी 1 कोटी 25 लाख रुपये निधी तात्काळ मंजूर करून वितरीत करण्याबाबत आदेश दिले आहेत. संबधित अधिका-यांनी लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे, असे आदेशही आपण दिले असल्याचं गडाख यांनी यावेळी सांगितलं.

हे ही पहा:

https://youtu.be/lbCAx3D6bzQ

Previous Post
देशाचे सांस्कृतिक केंद्र महाराष्ट्रच राहण्यासाठी आवश्यक सुविधा देणार - अजित पवार

देशाचे सांस्कृतिक केंद्र महाराष्ट्रच राहण्यासाठी आवश्यक सुविधा देणार – अजित पवार

Next Post
Jaynt Patil

मतांची बेरीज वाढवण्यासाठी तुम्ही तुमची रणनीती तयार करा, जयंत पाटलांचे पदाधिकाऱ्यांना निर्देश

Related Posts
नाना पटोले

देशातील ज्वलंत प्रश्नांची फक्त काँग्रेसला चिंता, जनतेच्या हितासाठी केंद्र सरकारला जाब विचारू : नाना पटोले

मुंबई – देशातील सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. रुपयाची दररोज घसरण होत आहे,महागाई व बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे.…
Read More
सासुबाईचा साखरपुडा चित्रपटाचे गाणे प्रदर्शित

सासुबाईचा साखरपुडा चित्रपटाचे गाणे प्रदर्शित

Sasubaicha Sakharpuda: समाजातल्या अनेक समस्यांपैकी उतारवयातला ऐकटेपणा ही समस्या अनेकांना भेडसावत आहे. या समस्येचा अनोखा मार्ग म्हणजे एकमेकांची…
Read More
ravi kishan

डाव्या विचारसरणीच्या लोकांना हिंदू नावाने अपस्मार होतो – रवी किशन

नवी दिल्ली- काली (Kaali) या माहितीपटाच्या पोस्टरवरून सुरू झालेला वाद संपताना दिसत नाहीये. पोस्टरमध्ये देवी कालीच्या वेषात एक…
Read More