“कोल्हापूरकरांसाठी शंभर टक्के निर्णय घेतले जात आहेत त्यामुळे या करवीरनगरीतून शंभर टक्के आमदार निवडून आणा”

Sunil Tatkare: स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या समाधीस्थळावर अजित पवार (AJit Pawar) आज नतमस्तक होऊन आले आहेत. आता अजित पवारांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरकरांसाठी शंभर टक्के निर्णय घेतले जातील. त्यामुळे या करवीरनगरीतून शंभर टक्के आमदार निवडून आणायचे आहेत असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी केले.

दादांनी सामुहिक निर्णय घेतला आहे. तो निर्णय पुढे नेण्याचे काम आपल्याला करायचे आहे असे सांगतानाच पुण्यनगरीत आज ज्या पध्दतीने अजितदादांच्या स्वागतासाठी लोक रस्त्यावर उतरले याचा अर्थ दादांचे नेतृत्व पुण्यनगरीने मान्य केले आहे. कोल्हापूरकरांनी ही आज विराट दर्शन देत दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.

दरम्यान आजच्या उत्तरदायित्व सभेसाठी प्रचंड जनसमुदाय जमवल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी आभार मानले.

महत्वाच्या बातम्या-

SBI Recruitment 2023: स्टेट बँकेत नोकरी करण्याची संधी, पगार 47,900 रुपयांपर्यंत असणार

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख; अवघ्या १४ महिन्यात १३,००० हुन अधिक रुग्णांना ११२ कोटी १२ लाखांची मदत वितरित