सतत बेताल वक्तव्य करणाऱ्या लोकांची जीभ छटावी; रुपाली पाटलांनी प्रसाद लाड यांना झापलं  

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा जन्म कोकणात झाला असल्याचे वक्तव्य भाजपाचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केलं आहे. भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या निमित्तानं आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत लाड यांनी हे वक्तव्य केलं आहे.

रुपाली पाटील यांची टीका

छत्रपती महाराज यांचा इतिहास माहीत नसेल तर माहिती करून घ्यावा मग बोलावे.पण सतत बेताल वक्तव्य करणाऱ्या लोकांची जीभ छटावी अशी कठोर शिक्षा दिल्याशिवाय सुधारणार नाही असे वाटते. इतिहासाचे अज्ञान असलेले भंगार सत्ताधारी. असं म्हणत रुपाली पाटील यांनी लाड यांच्यावर टीका केली आहे.

 

प्रसाद लाड यांचं वक्तव्य

“हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला. रायगडावर शिवरायांचं बालपण गेलं आणि याच रायगडावर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली”, असं वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलंय.