… तर आरपीआयचे लोक एकनाथ शिंदे यांना संरक्षण देतील, रामदास आठवले यांचा शिवसेनेला इशारा

मुंबई – एकनाथ शिंदे यांच्या कडे 37 आमदार असून महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले असून त्यांना सत्तेवर राहण्याचा आधीकार नाही. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची वेळ येईल तेंव्हा महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असल्याचे सिद्ध होईल असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे आणि भाजप सोबत युती करावी या मागणीसाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे बहुसंख्य आमदार एकत्र आले आहेत. या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली.त्यावेळी राज्यात सुरू असलेल्या घडामोडींवर भाजप ची वेट अँड वॉच ची भूमिका असून सरकार स्थापन करण्याची आपल्याला घाई नाही. शिवसेने चा हा अंतर्गत प्रश्न आहे. याबाबत आपण कोणतीही घाई करणार नसल्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली.

एकनाथ शिंदे यांच्या सोबत च्या 16 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्याची महाविकास आघाडी ची खेळी हा या अमदारांवर अन्याय ठरेल.या अमदारांवर निलंबन कारवाई असंविधानिक ठरेल.अशी चुकीची ; घटनाविरोधी कृती महाराष्ट्रात आम्ही खपवून घेणार नाही. एकनाथ शिंदेंसोबत चे आमदार मुंबईत आल्यावर ते आपला मताचा अधिकार बाजावतील.मात्र त्यांच्या वर कोणी दादागिरी करू नये. दादागिरी ची भाषा खपवून घेतली जाणार नाही.आमदार आणि त्यांच्या कुटुंबावर आणि कार्यालयावर हल्ला करण्याची दादागिरी ची चुकीची भूमिका कोणी घेतली तर आरपीआयचे लोक एकनाथ शिंदे यांना संरक्षण देतील,त्यांना साथ देतील असा ईशारा रामदास आठवले यांनी दिला.