… तर विजय शिवसेनेचाच होईल; सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर दिपाली सय्यद यांचे लक्ष्यवेधी ट्वीट

Mumbai –  शिंदे गटासोबत गेलेल्या आमदारांमुळे ठाकरे सरकार (Uddhav Thackeray) पडलं आणि राज्यात शिंदे सरकार (Eknath Shinde) आलं मात्र या सरकार विरोधात तसेच 16 आमदारांविरोधात ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात (Supreme) धाव घेतली. तसेच एक नाही दोन नाही तीन नाही, तब्बल चार याचिका दाखल केलेल्या याचिकेवरती आज सुप्रीम कोर्टात हाय व्होल्टेज सुनावणी पार पडली.

आज झालेल्या सुनावणीत दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तीवाद झाला. या सुनावणी दरम्यान शिंदे यांची बाजू हरीश साळवे (Harish Salve)यांनी लढवली तर शिवसेनेचे वकील म्हणून कपिल सिब्बल (Kapil Sibal)हे ठाकरे गटाचे बाजू मांडत होते.या याचिकेवर पुढील सुनावणी 1 ऑगस्टला घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सुप्रीम कोर्टात दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर गरज भासल्यास मोठ्या खंडपीठाकडेही पाठवले जाऊ शकतात असं मान्य करण्यात आले आहे. पक्षांना मुद्दे मांडण्यास, कागदपत्रे सादर करण्यास पुढील बुधवारपर्यंत वेळ दिला आहे.

दरम्यान, आजच्या या सुनावणीनंतर शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी एक ट्वीट केले आहे. त्या म्हणाल्या, अजुनही वेळ गेलेली नाही, आमदार खासदारांना शिवसेना पक्ष मागायला कोर्टात जाण्याची गरज लागणार नाही, आदरणीय उद्धव साहेब आणि आदरणीय शिंदे साहेबांनी चर्चा केली तर मार्ग निघेल, याची जबाबदारी दोन्ही बाजुने झाली तर विजय शिवसेनेचाच होईल. जय महाराष्ट्र. असं त्यांनी म्हटले आहे.