राज्यातील उध्वस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला या ‘ईडी’ सरकारला वेळ नाही – राष्ट्रवादी

मुंबई – राज्यात शिंदे – फडणवीस सरकार येऊन २६ दिवस झाले आणि या २६ दिवसात ९० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर दुसरीकडे अतिवृष्टीमुळे साडेआठ लाख हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे मात्र या उध्वस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला या ‘ईडी’ सरकारला वेळ नाही अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

आघाडी सरकारने घेतलेले निर्णय… केलेले निधीचे वाटप आणि योजना व विकासकामांना स्थगिती देण्याचे काम शिंदे – फडणवीस यांनी जोरात सुरू केले आहे असाही आरोप महेश तपासे यांनी केला आहे. दरम्यान राज्यात पावसामुळे झालेली हानी, शेतकर्‍यांची आत्महत्या याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गप्प का आहेत असा प्रश्न राज्यातील जनता विचारत आहे असेही महेश तपासे म्हणाले.