कल्याणचा खासदार होण्यासाठी मनसेची मदत घ्यावीच लागेल; राजू पाटलांचं सूचक वक्तव्य

Mumbai – मनसे (MNS) आणि शिंदे (Eknath Shinde) गट आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना खासदारकीवरून सुचक इशारा दिला आहे. यापुढे मनसेच्या मदतीशिवाय कोणीही कल्याणचा खासदार होऊ शकणार नाही, असे ते म्हणाले आहेत.

नेमकं काय म्हणाले राजू पाटील ?

मी आमदारकीला देखील उभं राहात नव्हतो, मात्र राजसाहेब म्हटले म्हणून आमदारकीची निवडणूक लढवली. ते उद्या म्हटले खासदारकीची निवडणूक लढव तर तीही मी लढवेल. मात्र आम्ही तेव्हाच जाहीर केलं होत लोकसभा निवडणूक लढवायची नाही. परंतु भविष्यात कल्याणचा जोही कोणी खासदार होईल मग तो मनसेचा असेल किंवा इतर कुठल्याही पक्षाचा त्याला मनसेची दखल घ्यावीच लागेल असं राजू पाटील यांनी म्हटलं आहे.