Uddhav Thackeray | काँग्रेस हिंदुंची संपत्ती काढून मुस्लिमांना देणार, यावर उद्धव ठाकरे गप्प का?
काही दिवसांपूर्वी शिवसेनेचं गीत लाँच करताना उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आम्ही महाराष्ट्रात ४८ जागा जिंकू, असा विश्वास व्यक्त केला होता. ४५+ हा भाजपाचा देशातला आकडा आहे. आम्ही महाराष्ट्रात ४८ जागा जिंकू असं सांगत उद्धव ठाकरेंनी टोला लगावला होता. यावर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
आपल्या एक्स अकाउंटवरुन ट्वीट करताना बावनकुळे म्हणाले, उबाठा उर्फ नकली शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज राज्यात ४८ लोकसभा जिंकणार असा हास्यास्पद दावा केला. एवढंच नाही तर संविधान बदलणार ही खोटी बोंबही ठोकली. मुळात मोदीजींच्या गॅरेंटीपुढे उद्धव ठाकरेंचा आणि त्यांच्या इंडी आघाडीचा निभाव लागत नाही. त्यामुळे संविधान बदलाच्या अफवा पसरवण्याचं काम ते करत आहेत. काँग्रेसनं एक दोन वेळा नाही तर ८० वेळा घटना बदलली पण उद्धव ठाकरे त्यावर मूग गिळून गप्प बसले आहेत, असा खोचक टोला त्यांनी लगावला.
उबाठा उर्फ नकली शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी आज राज्यात ४८ लोकसभा जिंकणार असा हास्यास्पद दावा केला. एवढंच नाही तर संविधान बदलणार ही खोटी बोंबही ठोकली.
मुळात मोदीजींच्या गॅरेंटीपुढे उद्धव ठाकरेंचा आणि त्यांच्या इंडी आघाडीचा निभाव लागत नाही. त्यामुळे संविधान बदलाच्या अफवा…
— Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) April 24, 2024
एवढंच नाही तर बहुजन हिंदुंची संपत्ती काढून अल्पसंख्याक मुस्लिमांना देणार असं काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात म्हटलंय. पण यावर उद्धव ठाकरे चकार शब्द काढायला तयार नाहीत. उद्धव ठाकरे सोनिया सेनेच्या भीतीपोटी किती हिंदूविरोधी भूमिका घेणार? असा सवालही यावेळी त्यांनी केला.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
Jay Pawar | संसदरत्न फार मोठा पुरस्कार नाही; जय पवार यांची पहिल्यांदाच सुप्रिया सुळेंवर थेट टीका