गद्दारांना लोकांनी पकडून रस्त्यावर मारलं पाहिजे, संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि ठाकरे गट यांच्या शाब्दिक चकमक सुरु असून आज पुन्हा एकदा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक चिथावणीखोर वक्तव्य करत शिवसेनेवर टीका केली आहे. एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) बाळासाहेबांबद्दल बोलण्याचा कोणताही अधिकारी नाही. गद्दारांना रस्त्यावर पकडून मारले पाहिजे, हा बाळासाहेबांचा विचार होता. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आयुष्यभर गद्दारांविरोधात लढले असं म्हणत संजय राऊतांनी शिवसेनेचा समाचार घेतला आहे.

ते म्हणाले, “बाळासाहेबांचा हा विचार राज्यातील जनता अंमलात आणेल, अशी भीती सध्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या ४० गद्दार आमदारांना आहे. त्यामुळेच त्यांना मोठ्या प्रमाणात सुरक्षा देण्यात आली आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी केली.