उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईतून तडीपार करू – आशिष शेलार

Mumbai – काल (12 ऑगस्ट) भाजपची कार्यकारिणी आज जाहीर झाली. त्यामध्ये आशिष शेलार यांच्याकडे दुसऱ्यांदा मुंबई भाजपच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानंतर शेलार यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले. सोबतच एक निर्वाणीचा इशारा देखील दिला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या भ्रष्ट कारभाराला आणि त्यांच्या शिवसेनेला मुंबईतून तडीपार केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा आशिष शेलार यांनी दिला आहे. आशिष शेलार म्हणाले, मुंबई महापालिकेत गेल्या तीन दशकांपासून फक्त कंत्राटदारांना पोसण्याचं काम शिवसेनेने केलं. सांडपाणी निविदा प्रक्रियेतील दिरंगाई आणि त्यातील घोळ यापासून नेत्यांना पळ काढता येणार नाही. सांडपाणी निविदा प्रक्रियेत शिवसेनेने भ्रष्टाचार केलाय.त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या भ्रष्ट कारभाराला आणि त्यांच्या शिवसेनेला मुंबईतून तडीपार केल्याशिवाय गप्प बसणार नाही. आता आमचं ठरलंय, मुंबई महापालिकेत बदल अटळ आहे. मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर बसणार, असं वक्तव्य शेलार यांनी यावेळी केलं आहे.