भाजपचे हिंदुत्व हे ढोंगी हिंदुत्व, गृहमंत्री स्वतःच्या पक्षातील आमदारावर कारवाई करण्याची हिम्मत दाखवणार का?

Ram Kadam: राज्यात अंधश्रद्धा निर्मूलनचा कायदा असताना देखील असे प्रकार घडतातच कसे ? राज्यात पोलीस नाहीत का? कंबल वाला बाबा महिलांसोबत करत असलेले कृत्य हे निंदनीय आहे. पोलिसांनी यासंदर्भात कंबल वाला बाबा आणि आयोजकांवर विनयभंगाचे गुन्हे दाखल करावेत. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्याताई चव्हाण (Vidyatai Chavan) यांनी केली आहे. तसेच या घटनेचा निषेध देखील व्यक्त केला आहे.

कंबल वाला बाबा यांच्याकडून करण्यात येत असलेल्या बुवाबाजीचे प्रकार ताबडतोब थांबवण्यात यावे. तसेच त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पक्षातील आमदार राम कदम यांच्याकडून असे प्रकार होत आहेत. त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. परंतु हे कोण करणार असा प्रश्न देखील यामुळे उपस्थित होत आहे. असे विद्याताई चव्हाण यांनी यावेळी म्हटले आहे.

विद्याताई चव्हाण म्हणाल्या की राम कदम यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या कुटुंबीयांना जर याचा फायदा झाला असेल तर राम कदम बुवाबाजीच्या नादाला लागले आहेत. जर यामधून महिलांची छेडछाड होत असेल तर पोलीस जर कारवाई करत नसतील तर राष्ट्रवादी काँग्रेस अशा भोंधुगिरी करण्याऱ्या लोकांना धडा शिकवण्याकरिता समर्थ आहे. तसेच भोंदू बाबा आणि आयोजक यांच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. जर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तर पोलीस स्टेशन समोर राष्ट्रवादी काँग्रेस महिला च्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी बोलताना दिला आहे.

राज्यामध्ये 700 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यात आधी गारपीट ,आवकाळी पाऊस आणि आता दुष्काळाने शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्य सरकारच्या धोरणामुळे शेतकरी संकटात आला आसस्ताना मराठवाड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकी करिता मुख्यमंत्री पंचतारांकित हॉटेलमध्ये 32 हजार प्रतिदिवसीय भाड्याने रूम बुक करतात. आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी प्रचंड खर्च केला जातो . मुंबईत सुद्धा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणावळी आणि मीटिंग घेतल्या जातात . ही नवीनच संस्कृती शिंदे सरकारने आणली आहे. एकीकडे शेतकरी हवालदिल असतांना अशाप्रकारे पैशाची उधळण होत आहे. मुख्यमंत्री नगर विकास मंत्री असल्यामुळे अशा प्रकारचे पैशाचे उधळण करण्याची त्यांची सवय आसेल असे देखील विद्याताई चव्हाण यांनी म्हटले आहे.

https://youtu.be/igs_KEHGv_g?si=-dHV1iQBLGLbEBd_

महत्त्वाच्या बातम्या-
संभाजी भिडेंच्या विरोधात कारवाई होत नसल्याने तुषार गांधी ठोठावणार न्यायालयाचा दरवाजा

‘जगाला पोखरणारी डावी वाळवी’ पुस्तकाचे होणार Mohan Bhgwat यांच्या हस्ते प्रकाशन

‘नवीन आरोग्यकेंद्र, उपजिल्हा रुग्णालयांना मंजुरीसह श्रेणीवर्धन व पदभरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करा’