‘उद्धव ठाकरे यांना सोडून कोण कुठेही गेले तरी शिवसेनेला काही फरक पडणार नाही’  

भंडारा  – महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारवर (MVA) राजकीय संकटाचे ढग दाटले आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बंडखोर झाल्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकार संकटात सापडले आहे. शिंदे यांची बंडखोर वृत्ती पाहता शिवसेनेने त्यांना विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हटवले असले तरी या निर्णयांमुळे एकनाथ शिंदे हे कोणत्याही दबावाखाली दिसत नाहीत.

गुवाहाटी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी गुरुवारी एकनाथ शिंदे यांची नेता म्हणून निवड केली. यासोबतच विरोधी विचारसरणीच्या पक्षांशी युती केल्यामुळे गेल्या अडीच वर्षांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना केडरकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप बंडखोर आमदारांनी केला. या सर्व कारणांमुळे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड पुकारले आहे.

विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून राज्यातील राजकारणाला वेगळीच दिशा दिली. एकनाथ शिंदे यांच्यामुळे प्रहार संघटनेचे दोन आमदार सोडून सगळे आमदार हे शिवसेनेचेच फोडले मात्र भंडारा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख नरेश डहारे, रश्मी पातुरकर यांनी मात्र शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांनी कोण कुठेही गेले तरी भंडारा जिल्ह्यातील शिवसेनेला काय फरक पडणार नाही, आम्ही तुमच्यासोबतच राहणार असल्याचा विश्वास त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. राज्यात चाललेल्या बंडखोरी नाट्याचा कोणताही फरक भंडारा जिल्ह्यावर होणार नसून, आता आणखी जोमाने शिवसेना काम करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.