देशाला महासत्ता काँग्रेसने बनवले, काँग्रेसशिवाय देशाला कुठलाही पर्याय राहिला नाही – पटोले 

नागपूर –महागाई, बेरोजगारीकडे (Inflation, unemployment) लक्ष देणे गरजेचे आहे. भाजपने गेल्या आठ वर्षांत देशाला 50 वर्ष मागे नेले आहे. आता काँग्रेसमध्ये येणाऱ्या निवडणुकांत एका कुटुंबाला एकच तिकीट मिळेल. महापालिका निवडणुकीतही हाच कित्ता गिरवला जाईल अशी माहिती कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole)  यांनी सांगितले आहे.

पटोले म्हणाले की,  आगामी काळात काँग्रेसकडून देशात जनजागरण मोहीम राबवली जाणार आहे. देशाला महासत्ता काँग्रेसने बनवले. सत्तेसाठी काहीही करायचे, ही काँग्रेसची भूमिका राहिलेली नाही. काँग्रेसशिवाय देशाला कुठलाही पर्याय राहिला नाही, असा दावा त्यांनी केला.

निवडणूक जिंकण्यासाठी ज्या प्रमाणे भाजप धर्माचा गैरवापर करतो, तसे काँग्रेस करणार नाही. आम्ही विचारानेच लढाई जिंकू. नाना पटोले विचारासाठी, जनतेसाठी लढणारा कार्यकर्ता आहे. नाना पटोलेने राजीनामा सांगून दिला. नाना पटेलेचा इतिहास स्पष्ट आहे. जे माझ्याबद्दल बोलतात त्यांची पार्श्वभूमी विचारा. असं म्हणत नाना पटोले यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.