“एकनाथ शिंदेंसारखा सक्षम माणूस हे राज्य चालवू शकतो, पण…”

मुंबई – भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे नेहमी वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतात. आज सुद्धा दानवे हे एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

उद्धव ठाकरे आजारी आहेत. ते बरे व्हायला काही दिवस तरी लागतील. अशावेळी विना प्रमुखांचं राज्य कसे चालेल? असा प्रश्न रावसाहेब दानवे यांनी विचारला. तसेच राज्यात एकनाथ शिंदे यांच्यासारखा सक्षम माणूस आहे. ते राज्य चालवू शकतात, पण तरीही त्यांच्याकडे जबाबदारी दिली जात नाही, असा आरोप दानवेंनी उद्धव ठाकरेंवर केला.

रावसाहेब दानवे म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत. ही गोष्ट काही सांगण्याची नाही. ते आजारातून लवकर बरे व्हावेत अशी आमच्या पक्षाची आणि माझी व्यक्तिगत भूमिका आहे. त्यांनी या राज्यातील १२ कोटी जनतेची सेवा करण्यासाठी पुन्हा एकदा उपलब्ध व्हावं, असं आमचं मत आहे. पण जर ते लवकर बरे झाले नाही तर या राज्याला प्रमुख तर नेमला पाहिजे. ते बरे व्हायला काही दिवस तर लागतील.”असं दानवे म्हणाले.