‘हे खोके सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या भल्याचं आहे का याचा विचार जनतेनं करण्याची गरज’

मुंबई : शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी यांनी मुंबईतील गणपती मंडळांना भेट दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर टीकेची झोड उठवली. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे समर्थक मंत्र्यांवर आदित्य ठाकरेंनी टीका केली. त्यांनी यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) आणि अन्न व औषथ प्रशासन मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर नाव न घेता टीका केली.

आरोग्यमंत्र्यांनी जाऊन हाफकिन नावाचा माणूस म्हटलं. त्यांना हापकिन पण दलाल वाटला. हाफकिन संस्था शासनाची संस्था आहे हे देखील त्यांना माहिती नव्हतं. ती खूप मोठी संस्था आहे हे त्यांना माहिती नाही. दुसऱ्या मंत्र्यांनी महत्त्वाच्या खात्याचा पदभार देखील घेतलेला नाही. हे खोके सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या भल्याचं आहे का याचा विचार जनतेनं करण्याची गरज असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.