प्रशंसनीय भूमिका : पंढरपूरमधील मशिदींमधून अजानसाठी लाऊडस्पीकरचा वापर टाळला

मुंबई – जिथे जिथे भोंग्यावरून बांग दिली जाते तिथे तिथे भोंग्यावरून हनुमान चालीसाचे (Hanuman Chalisa)  पठण करावे, असे आवाहन करीत मनसेचे प्रमुख राज ठाकरे(MNS chief Raj Thackeray)  यांनी भोंग्यांचा त्रास काय होतो हे त्यांनाही समजू दे, असं म्हटलं आहे. देशभरात प्रत्येक राज्यात आपापल्या सत्ताधाऱ्यांना हिंदुची ताकद(The strength of Hindus)  दाखवून द्या, असा आदेश राज यांनी कार्यकर्त्यांना दिला. राज ठाकरे यांनी बुधवारपासून भोंग्यांविरोधात आंदोलन सुरू करण्याचे आवाहन करणारे पत्र प्रसारित केले असून याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक शहरांमधील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय.

एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला राज्यात राज ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक मशिदींमध्ये अजान स्पीकर्सशिवाय दिली गेली. ज्या ठिकाणी नियमांचे पालन केले गेले त्या ठिकाणी मनसैनिकांनी सुद्धा हनुमान चालीसा पठन केले नाही. त्यामुळे राज्यात सध्या तरी शांतता आहे. न्यायालयाच्या निर्णयाचे पालन आता मुस्लीम बांधव करत असल्याने मनसेच्या विरोधाची धार सुद्धा कमी होणार आहे.

पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त ठेवला असून वाद टाळण्यासाठी आणि सामाजिक एकोपा जपला जावा यासाठी अनेक मशिदींच्या मौलवींनी यापुढे भोंग्यांचा वापर करणार नसल्याचे जाहीर आहे. राज ठाकरे यांनी काल सायंकाळी केलेल्या आवाहनानंतर, पंढरपूरमधील मशिदींमधून आज सकाळच्या अजानसाठी लाऊडस्पीकरचा वापर केला गेला नाही. सामाजिक सलोख्याचे भान बाळगणारी ही भूमिका प्रशंसनीय आहे. असं मनसेने म्हटले आहे.