भाजपाचा फार मोठा विजय म्हणण्याचे कारण नाही; अमोल मिटकरी यांची भाजपवर टीका

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे (MVA) तीन उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. पण, या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कारण, महाविकास आघाडीची अनेक मते फुटली असल्याचे समोर आले आहे. या निवडणुकीत भाजपने केलेली खेळी यशस्वी झाली असून सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी खेळलेल्या खेळीला यश आले आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, शिवसेनेच्या संजय पवारांना पहिल्या फेरीत सर्वात जास्त पसंदीची मते आहेत. त्यामुळे भाजपा चा फार मोठा विजय म्हणण्याचे कारण नाही. काही अपक्षाच्या जोरावर दगा फटका करणारी ही कपटी खेळी भविष्यात तुमच्या गर्व हरणाला पुरेशी ठरणार.असं त्यांनी म्हटले आहे.