भरगोस उत्पादनासाठी सरळ व संयुक्त खतातून पिकांना संतुलित प्रमाणात खत द्या

लातूर :- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत्‍ मृद आरोग्य पत्रिकेच्या दुसऱ्या चक्रानुसार लातूर जिल्हयातील सुपिकता निर्देशांक पातळी नत्र- कमी, स्फुरद – मध्यम आणि पालाश- भरपूर अशी आहे. त्यानुसार या रब्बी हंगामात हरभरा, करडई व रब्बी ज्वारीच्या भरगोस उत्पादनासाठी संतुलित खताचा वापर करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, दत्तात्रय गवसाने यांनी केले आहे.

जमिन आरोग्य पत्रिका अभियान अंतर्गत दुसऱ्या चक्रानुसार (सायकल) च्या नुसार लातूर जिल्हयातील सुपिकता निर्देशांक पातळी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हयातील शासकीय जिल्हा मृद चाचणी प्रयोगशाळे मार्फत जिल्हयातील 943 ग्रामपंचायत मध्ये मृद परीक्षण अहवालानुसार सुपिकता निर्देशांक फलक तयार करुन तालुका कृषि अधिकारी कार्यालयामार्फत लावण्यात आले आसून, त्यात क्षेत्रीय कर्मचाऱ्यामार्फत गावनिहाय सुपिकता निर्देशांकानुसार खताचा पिकनिहाय वापर या बद्दल पेरणी पूर्व मार्गदर्शन करण्यात आले. यात बाजारात उपलब्ध्‍ असलेल्या खताच्या अनुषंगाने सरळ व संयुक्त खताचा वापर करुन खताच्या खर्चात बचत करण्याचे आवाहन करण्यात आले.

जिल्हयात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत हरभरा 1356 हेक्टर, करडई 450 हेक्टर व रब्बी ज्वारी 1140 हेक्टरवर पिक प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले आहे. यात मृद परिक्षण अहवालनुसार संतुलित खताचा वापर करुन उत्पादन वाढीचे लक्षांक साध्य करण्यात येणार आहे.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post

‘महिला अत्याचारांच्या असंख्य घटना घडत असताना सरकारमधील मंत्र्यांना त्याचे काहीच सोयरसुतक नाही’

Next Post

धान खरेदीबाबत आलेल्या सूचनांवर काटेकारपणे कार्यवाही करा – भुजबळ

Related Posts

अमोल कोल्हे नथुरामच्या भूमिकेचं मानधन परत करणार का?

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेतून घराघरात आणि जनतेच्या मनात पोहोचलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल…
Read More
new year

‘नवीन वर्षाचे स्वागत अवश्य करा, मात्र नियमांचे पालन करुनच’

जालना : ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने नवे निर्बंध लागू केले आहेत, त्यामुळे नागरिकांनी या नियमांचे पालन करुनच…
Read More
पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या विरोधात पाण्याच्या प्रश्नासाठी मराठवाड्यातील हे मंत्री तोंड का उघडत नाहीत ? 

पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या विरोधात पाण्याच्या प्रश्नासाठी मराठवाड्यातील हे मंत्री तोंड का उघडत नाहीत ? 

अंबाजोगाई  – मराठवाडा वॉटरग्रीड योजना कार्यान्वित झाली असती तर खर्‍या अर्थाने मराठवाड्यातील सिंचनाचा प्रश्न आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न…
Read More