Border Security Force | सुरक्षा दलाचे मोठे यश; २५ लाखांचे बक्षीस असणारे दोन नक्षलवादी ठार

महाराष्ट्राला लागून असलेल्या छत्तीसगढच्या सीमाभागात सुरक्षा दल (Border Security Force) आणि नक्षलवादी यांच्यात काल झालेल्या चकमकीत 29 नक्षलवादी ठार झाले. छोटे बेठिया पोलीस ठाणे क्षेत्रांत नक्षली हालचालींची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी ही कारवाई केली.

सीमासुरक्षा दल (Border Security Force) आणि कांकेर जिल्हा राखीव दलाचे जवान कारवाईसाठी जात असताना या ताफ्यावर नक्षल्यांनी हल्ला केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात नक्षली ठार झाले. या चकमकीत शंकर राव आणि ललीता मडावी हे दोन नक्षली ठार झाले असून त्यांची माहिती देणाऱ्याला प्रत्येकी 25 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर झालं होतं.

गृहमंत्रालयानं या यशाबद्दल सुरक्षा दलाचं अभिनंदन केलं आहे. नक्षलवाद हा देशाची शांतता, विकास आणि युवकांचं उज्ज्वल भविष्याचा शत्रू असल्याचं मंत्रालयानं ट्विटर संदेशात म्हटलं आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | भावनिक न होता देशाच्या भवितव्यासाठी महायुतीला मतदान करा; माजी सैनिकांच्या मेळाव्यात अजित पवारांचे आवाहन

Shivajirao Adhalrao Patil | “जनतेच्या प्रेमाची कळवळ म्हणून मी राजकारणात”, आढळराव पाटलांनी व्यक्त केल्या भावना

Ravindra Dhangekar | पुण्याच्या विकासापेक्षा धंगेकरांसाठी टिका टिपण्णी महत्त्वाची; व्हिजनच्या नावानेही बोंबाबोंब